संजयकाका पाटलांचा विशाल पाटील यांना थेट इशारा, म्हणाले…

सांगली: कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेरीनाला प्रश्न निर्माण झाला आहे. अख्या सांगलीला दूषित पाणी वर्षांनुवर्षे सांगलीकरांना प्यावे लागत आहे. भारत सूतगिरणी बंद पाडली, प्रकाश ऍग्रो, वसंतदादा मका प्रकल्प, साबुदाणा प्रकल्प, वसंतदाद कृषी संशोधन केंद्र, सोनी कारखाना, जिल्हा दूध संघ, शासकीय अनुदान लाटले ते काय केले. वसंतदादानी उभा केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या हे लोकांना समजते. माझे काढता मात्र, तुमचे कारनामे बाहेर काढून तक्रार केली तर पळताभुई थोडी होईल असा इशारा देत, लाट निर्माण करुन त्यावर स्वार होऊन, पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. केवळ लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्याची टीका संजय पाटील यांनी केली.
मराठा समाजाच्या मागणीला विरोध करणाऱ्याला असं पाडा की…, सोलापुरात मनोज जरांगे बरसले
तुमच्या घरात बारा वेळा खासदारकी होती, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान मिळाले. तुमच्या तत्कालीन खासदारांनी माझ्या पाच टक्के तरी निधी तुम्ही आणला का? असा सवाल करीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडा, अन्यथा मी मांडतो, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी केला. सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण टिकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीत निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंगेश साबळे खोटारडा, मनोज जरांगेंच्या नावावर मत मागण्याचा प्रयत्न; जरांगे समर्थकाचा आरोप

संजय पाटील म्हणाले, विशाल पाटील यांच्या घरात ३५ वर्षे खासदारकी, १५ वर्षे आमदारकी ते आमच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी ३५ वर्षाचा हिशोब द्यावा. ते माझ्या कामाचा हिशोब मागत आहेत. त्यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्यावा. प्रतीक पाटील यांना घरातूनच त्रास असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला. विरोधक म्हणून देखील त्यांनी कोणतेही काम केले नाही. सोशल मीडियाचा वापरून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.