लोकसभा निवडणूक निकाल २०२४  सांगली धक्कादायक अंदाज, भाजप पराभवाच्या छायेत, विशाल पाटील यांना सरशी

सांगली : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल अवघ्या तीन दिवसांवर आहेत. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडताच मतदारांचे डोळे एक्झिट पोलकडे लागले. टीव्ही९ पोलस्ट्राट-पीपल्स इनसाईट्स आणि एबीपी-सीव्होटर या दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ४८ पैकी एका मतदारसंघात अपक्ष किंवा इतर उमेदवार खातं उघडताना दिसत आहे.

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, रविकांत तुपकर, राजू शेट्टी, शांतीगिरी महाराज, इम्तियाज जलील, वसंत मोरे, किशोर गजभिये हे अपक्ष किंवा इतर पक्षांतील उमेदवार लक्षवेधी होते. मात्र काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघात सरशी मिळण्याची चिन्हं आहेत.

सांगलीत भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून चंद्रहार पाटीलही पराभूत होण्याची चिन्हं आहेत.

मतविभागणीचा फायदा ज्याला मिळतो, तो विजयी होतो, असा गेल्या दोन निवडणुकांतील इतिहास आहे. तो लक्षात घेता यंदा तिघांपैकी कोणता मल्ल धोबीपछाड देणार आणि ‘सांगली केसरी’चा मान पटकावणार हे मतविभागणीवरच अवलंबून असेल, असा अंदाज वर्तवला जात होता.
Maharashtra Election Exit Polls 2024 Live Updates : राणे-गडकरी आगे, पण महायुतीचे ९ स्टार उमेदवार मागे, एक्झिट पोलचे अंदाज काय?
यंदा विशाल पाटील यांना प्रचारादरम्यान मोठी सहानुभूती मिळाल्याचे चित्र दिसले. पलूसचे आमदार विश्वजित कदम यांनी सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांना सक्रिय पाठिंबा दिला. मात्र, पक्षादेश आणि आघाडीचे बंधन यामुळे नाईलाजाने त्यांना महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जाऊन चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात भाग घ्यावा लागला. अर्थात, कदम यांचा पाठिंबा मतांमध्ये परिवर्तित होणार का, हे प्रत्यक्ष निवडणुकीत पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Loksabha Election Exit Polls 2024 Live Updates : तामिळनाडूत इंडिया अव्वल, कर्नाटकात एनडीएला आघाडी, केरळात काय?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

खासदार संजय पाटील यांना भाजपने तिसऱ्यांदा रिंगणात उतरवले असून, त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या आहेत. फडणवीस यांच्या मध्यस्थीने पलूस-कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नुकताच झाला. दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा नेटाने प्रचार करण्याचे वचन दिल्याचे भाजपकडून सांगितले जाते.