देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची विधिमंडळात अचानक भेट, लिफ्टवरुन जोरदार हशा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टमधील भेट ताजी असतानाच आता विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. यावेळी लिफ्टवरुनच दोघांमध्ये पुन्हा हास्यविनोद रंगले आणि एकच हशा पिकला.

विधिमंडळाच्या लॉबीत कोणे एकेकाळचे मित्र आणि आताच्या विरोधकांमध्ये हलका फुलका संवाद रंगल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आपल्या कार्यालयातून बाहेर आले आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे अचानक एकमेकांच्या समोरासमोर आले.

काय झाला संवाद?

नमस्कार, काय चाललं आहे? असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारताच, मी लिफ्टमध्ये चाललोय असं आदित्य ठाकरेंनी मिश्किलपणे म्हटलं. त्यानंतर दोघं एकमेकांकडे पाहून जोरात हसले. मग काही चर्चा करत स्मितहास्य करुन दोघेही निघून गेले. त्यावेळी प्रसाद लाडही तिथे उपस्थित होते.
Ambadas Danve-Prasad Lad : आई २५ वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली, अंबादास दानवेंचे शब्द मनाला लागले, रात्रभर झोप नाही, प्रसाद लाड भावूक

उद्धव ठाकरे-फडणवीस भेट

भाजप आणि शिवसेना वेगळे झाल्यापासून एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात, २७ जून रोजी विधानभवनात एकत्र दिसून आले. विधानभवनाच्या लिफ्टसमोर त्यांची भेट झाली होती. लिफ्टमधून एकत्र चर्चा करत ते सभागृहात गेले होते. या राजकीय घडामोडीची चर्चा दीर्घ काळ रंगली असतानाच आता ठाकरे पुत्र आणि फडणवीस यांची अवचित भेट घडून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.Sushma Andhare : गिरीश महाजनांना निलंबनाचं शहाणपण बिधुडी, सत्तार, शिरसाटांच्या वेळी सुचलं नाही का? सुषमा अंधारेंचे सवाल
तुम्ही दोघे सोबत छान दिसता, असं फडणवीस आणि ठाकरेंना एकत्र पाहून लिफ्टजवळ कोणीतरी म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस लिफ्टमध्ये जात असताना ठाकरेंनी भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडे बोट दाखवत याला आधी बाहेर काढा, असं गमतीने म्हटलं. त्यावर दरेकरांनी तुमचं अजून समाधान झालं नाहीए का? तुम्ही एकत्र प्रवास करणार असाल तर मी बाहेर पडतो. तुम्ही सोबत जा, असं मजेदार उत्तर दिलं होतं.

दरम्यान, ठाकरे-फडणवीसांची होणारी भेट लक्षात घेता, दोघांमधील कटुता आता कमी होतेय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या या भेटीने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या भुवया नक्की उंचावल्या असाव्यात.