दुर्दैवी! अंत्यविधी करुन घरी निघाले, वाटेत भरधाव ट्रकने उडवले, पुण्यात तिघांचा मृत्यू

पुणे: पुण्यामधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील असणाऱ्या नगर कल्याण महामार्गावर अपघात घडला आहे. बरदा वेगाने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकी स्वरांना चिरेडलाची माहिती समोर आली आहे. अंत्यविधी करून हे नागरिक माघारी माघारी येत असताना ही घटना घडली आहे. अपघात तिघांचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

अंत्यविधीनंतर घरी परतताना ट्रकची धडक

जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी परिसरामध्ये हा अपघात घडला असून अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरिकांना या भरधाव ट्रकने उडवले आहे. आज सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे.
Railway Police Saves Passenger: कमरेवर चार वर्षांचा मुलगा घेऊन धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, हात निसटला अन्… थरारक VIDEO
जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात मृत्यू व जखमींची संख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावर स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नगर कल्याण महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची येजा सुरू असते.

आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिक अंत्यविधी करण्यासाठी गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम उरकल्यानंतर काही जण आपली गाडी घेऊन घराकडे निघाले. मात्र, महामार्गावरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने या तीन दुचाकी चालकांना उडवले. ही धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. तर चालकावर कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.