दानवे यांच्या निलंबनावर गुरूवारी निर्णय, सभापतींना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त

प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर गुरुवारी फेरविचार होणार आहे. निलंबन झाल्यानंतर दानवे यांनी बुधवारी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्षनेत्यांकडूनही सभापतींना निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. गुरुवारी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यावर निवेदन करणार आहेत. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर दानवे यांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे.

प्रसाद लाड यांना शिवीगाळ प्रकरणी झालेली कारवाई

सोमवार १ जुलै रोजी परिषदेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांना उद्देशून अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर त्यांचे सभापती डॉ. गोऱ्हे यांनी पाच दिवसांसाठी निलंबन केले. या निलंबनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती.
Ambadas Danve : अंबादान दानवे विधानपरिषदेतून निलंबित, शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई
बुधवारी दानवे यांनी सभापतींना पत्र लिहित सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू-परंतू नाही असे स्पष्ट केले. या पत्राचा दाखला देत आमदार अनिल परब यांनी सभापतींना निलंबनाचा फेरविचार करण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेत्यांशिवाय सभागृह चालू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा, अन्यथा तोपर्यंत आपण सभागृहात खाली बसून कामकाज पाहू, असा इशारा देत इतर विरोधी पक्षातील आमदारांसह सभागृहातच खाली बसले. मात्र, त्यावर सभापती यांनी लक्षवेधी मांडून झाली की त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन देत. सभागृहाचे कामकाज चालण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला.
Eknath Shinde : संयम सुटत असेल मात्र तो राखा, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचं आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरविचाराविषयी गुरूवारी सकाळी निवेदन करतील, असे स्पष्ट केले. दिलगिरीनंतर दानवे यांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या निलंबनाचा निषेध करण्यासाठी दानवे समर्थकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान अंबादास यांचं प्रसाद लाड यांना शिवीगाळ गेल्याप्रकरणी सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. आता त्यावर फेरविचार केला जाणार आहे.