महाराष्ट्रातील सांगली ‘सोनम रघुवंशी’ प्रकरणाचा उलगडा, नवऱ्याला का संपवलं, अखेर गूढ उकललं

Sangli Wife Finish Husband Marathi News : सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या अवघ्या सतराव्या दिवशी पत्नीने पतीची कुऱ्हाडीने हत्या केली. अनिल लोखंडे यांनी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याने राधिकाला भीती वाटली, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

(फोटो)
सांगली : देशभर सोनम रघुवंशी प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे. हनिमुनला गेल्यावर प्रियकराच्या साथीने आपल्याच नवऱ्याचा तिने काटा काढला. राजा रघुवंशी याच्या हत्येबाबत सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत. अशातच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाच्या सतराव्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीला संपवल्याने खळबळ उडाली आहे. पण तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत सर्व माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्ह्यामधील सांगलीच्या कुपवाड मधील प्रकाशनगर मध्ये एकता कॉलनीत रात्री पती झोपल्यावर अनिल लोखंडे याची पत्नीने हत्या केली होती. दोघांनीही २३ मे २०२५ ला लग्न केले होचे. लग्नानंतर १७ व्या दिवशी पत्नी राधिका हिने डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची हत्या केली. मात्र हत्येमागे एक भीती होती, ज्यामुळे आरोपी पत्नी राधिकाने आपल्याच कुंकवाला संपवलं.अनिल लोखंडे हा गवंडी म्हणून काम करत होता. त्याचे आधी लग्न झाले होते, त्याला दोन्ही मुली होत्या. त्यांची लग्न झाली असून त्याच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे जेवणाचे हाल होत असल्याने अनिलने राधिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होताय. राधिकाला जन्मापासूनच गर्भपिशवी नव्हती, ही गोष्ट अनिललाही माहिती होती.

अनिलच्या खूनाचं कारण काय?

१० जूनला वटपोर्णिमेला राधिकाल अनिल याने तिच्या मावस भावाच्या घरी सोडले होते. संध्याकाळी तिला त्याने आणायला गेला आणि घरी घेऊन आला. त्यावेळी त्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली, मात्र राधिका नकार देऊ लागली. पण अनिल शरीर संबंध ठेवणार याची भीती तिला वाटू लागली. रात्री अनिल झोपल्यावर राधिका पाणी प्यायला उठली आणि येताना कुऱ्हाड गेऊन आली. अनिलला काही समजण्याआधीच तिने डोक्यात घाव घालून त्याला संपवलं. लग्नाला महिना सोडा पण वटपोर्णिमेच्याच दिवशी राधिकाने आपल्या नवऱ्याला मारून टाकलं. ज्या घरात लक्ष्मी म्हणून आली पण तिनेच आपल्या कुंकाला संपवलं. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)