Uddhav Thackeray : ‘अंबादास दानवेंचे निलंबन म्हणजे षडयंत्र’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Uddhav Thackeray : विधानपरिषदेतून विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर शिवीगाळ प्रकरणी निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रसाद लाड यांच्याकडून दानवेंनी विधानपरिषेदत शिवीगाळ केली असा आरोप केला. यावरच विधानपरिषदेतून कारवाई करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज विधानपरिषदेत अंबादास दानवे यांच्यावतीने बाजू मांडत जर अंबादास दानवे चुकीचे काही म्हणाले असतील तर मी माफी मागतो असे म्हणाले इतकेच नव्हे तर चंद्रकात पाटील यांचे सुप्रिया सुळेंवरील विधान आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाची आठवण सुद्धा ठाकरेंनी करुन दिली. अंबादास दानवेंवरील कारवाई ठरवून षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले असा घणाघात ठाकरेंनी केला, असे पहिल्यादांच घडले की विरोधपक्ष नेता निलंबित होतोय. कालचा आमचा दणदणीत विजय झाकाळून टाकण्यासाठी दानवेंचे निलंबन केले असा थेट आरोप ठाकरेंनी केला.

अर्थसंकल्प निवडणुकांच्या तोंडावर गाजर

बोगस अर्थसंकल्प मांडलाय त्यांची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केली. तुमचा आवाज मांडताना सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचा आवाजच दाबला जातोय अशी खंत ठाकरेंनी राज्यातील जनतेसमोर मांडून दाखवली. राज्यसरकारने मांडलेला अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दाखवलेले गाजर आहे या शब्दांत ठाकरेंनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली आहे
Ambadas Danve-Prasad Lad : आई २५ वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली, अंबादास दानवेंचे शब्द मनाला लागले, रात्रभर झोप नाही, प्रसाद लाड भावूक

उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींची पाठराखण

राहुल गांधी यांनी मुळात हिंदुत्वाचा अपमान केला नव्हता मग भाजप चुकीचा ठराव विधानपरिषदेच्या सभागृहात का आणत होती, म्हणून अंबादास दानवे आणि विरोधकांनी विरोध केला त्यात काय चुकले, कोणीही हिंदुत्वाचा अपमान केला नाही, राहुलजी काहीही चुकीचे म्हणाले नाही, त्यांचे संसदेतील भाषण मुद्दयाचे होते, संसदेत काही खासदारांनी जय संविधान बोलण्यावर सुद्धा आक्षेप घेतला यांना संविधानांची पण का इतकी धास्ती असा सवाल ठाकरेंनी विचारला.


विधानपरिषदेच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षकांचे मानले आभार. लढाईत हार जीत होत असते पण हिम्मत हारता कामा नये अशी भूमिका ठाकरेंनी मांडली आहे. विधापरिषदेसाठी आम्ही तीन उमेदवार दिले आहेत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, सेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील अशी घोषणा ठाकरेंनी केली.