पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याची ही घटना घडली आहे. या घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे, घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे, बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही अनेक पर्यटक बेपत्ता आहेत.
कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे. या घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेले आहेत.
रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी आले होते. काही जण या पुलावर उभे होते, त्याचवेळी हा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.
या घटनेत नेमके किती पर्यटक वाहून गेले, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाहीये, मात्र 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.