Posted inसांगली

नातीचा दुसरा बर्थडे धडाक्यात, आजोबा लेकीबाळींना घेऊन निघाले, अर्ध्या रस्त्यातच होत्याचं नव्हतं

सांगली : तासगाव-मणेराजुरी महामार्गावर चिंचणी गावानजीक मंगळवारी मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. एका महिलेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील कुटुंबीयसह कारमधून कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर कुटुंबीयासमवेत ते तासगावला परतत होते. मध्यरात्री तासगाव […]