Posted inमुंबई

Central Railway: खबरदार! रेल्वेत विनाकारण साखळी ओढाल तर…, वर्षभरात ‘इतक्या’ प्रवाशांवर कारवाई

मुंबई : फलाटावर थांबून चहा आणि नाश्ता करताना उशीरा झाला किंवा प्रवाशांना सोडायला येणारा नातेवाइक गाडीतच राहिला की, तातडीने साखळी ओढून मेल किंवा एक्स्प्रेस गाडी थांबवली जाते. मात्र या कारणांमुळे मुंबईत लांब पल्ल्याच्या रोज १२ गाड्यांचे वेळापत्रक बिघडत आहे. शिवाय मेल गाड्या रखडल्याने मध्य रेल्वेच्या लोकलसेवेवरही परिणाम होत आहे. मध्य रेल्वेवर वर्षभरात ११,४३४ वेळा विनाकारण […]