Sant Tukaram Maharaj Palakhi: आषाढी वारीतील एकोप्याचे आदर्शवत उदाहरण; मुस्लीम कुटुंबीयांकडून तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी अंथूर्णे येथे मुक्कामासाठी थांबत असते. यादरम्यान शेख कुटुंबीय संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या घालतात. शेख कुटुंबीयांना मान देऊनच पालखीचा मुक्काम अंथुर्णे येथे पार पडतो. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या वारीत सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने हरिनामात गुंग होऊन पायी रस्ता कापत असतात. यामध्येच शेख कुटुंबीय हे देखील एक आदर्शवत उदाहरण आहे.

शेख कुटुंबीयांची पाचवी पिढी संत तुकाराम महाराजांची सेवा करत आहे. अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने शेख कुटुंबीय संत तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या घालून आपली सेवा बजावत असतात. अंथुरणे गावातील श्री तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवात देखील देवीच्या पालखीला पायघड्या घालण्याचा मान शेख कुटुंबीयांना असल्याचा हे कुटुंबीय सांगतात. शेख कुटुंबीयांना पालखीच्या वेळी मान म्हणून केवळ नारळ दिला जातो, त्यातच ते खूप समाधानी आहेत. शेख कुटुंबीयांनी पालखीला पायघड्या घातल्याशिवाय पालखीची मिरवणूक नवरात्रात निघू शकत नाही, असं देखील कुटुंबीय ठामपणे सांगतात.
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीनिमित्त श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा “भक्तीच्या शक्तीतून निसर्गसंवर्धनाकडे” नावीन्यपूर्ण उपक्रम
सोशल मीडियामुळे जो जातीधारित वाद उफाळतो तो थांबला पाहिजे. लोकांमधील जातीय तेढ कमी झाली पाहिजे. राजकारण्यांमुळे जातीवाद वाढल्याचे कुटुंबीय सांगतात. पण आम्ही जातिवाद मानत नाही आमच्यासाठी देव सारखेच आहेत सगळे एकच आहेत म्हणून आम्ही संत तुकाराम महाराज आणि तुळजाभवानीची सेवा करत असल्याचे देखील शेख कुटुंबीय आत्मीयतेने सांगतात.
Ashadhi Vari: वय ९०, गुडघे थकले, पण पंढरीची ओढ; नातवाच्या खांद्यावर बसून ‘सुंदर’ आजी वारीला
या कुटुंबीयांचा आदर्श इतरांनी सुद्धा घेतला पाहिजे, यामुळे समाजातील जातीय सलोखा टिकून राहील, आपापसातील मतभेद टळतील, अशा शेख कुटुंबीयांप्रमाणेच वारकऱ्यांच्या देखील मतभेद विसरून एकत्र येण्याची भावना व्यक्त होत आहे.