संजय राऊतांचा तो खळबळजनक दावाImage Credit source: टीव्ही 9 मराठी
एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी कोसळले. यात विमान क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हवाई वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच खासदार संजय राऊतांनी आज सकाळी पत्र परिषद घेत, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? असा सवाल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय तरी काय? हा पहलगामसारखाच एक हल्ला असल्याचे त्यांना सुचवायचंय का? काय म्हणाले राऊत?
राऊत म्हणाले की, ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. देशातील आणि परदेशातील अनेक एजन्सी सध्या अपघाताचा एकत्रित तपास करत आहेत. ब्रिटनचं पथक आले आहे. पोर्तुगालचे पथक आले आहे. अमेरिकेतील बोईंग कंपनीची टीम आलेली आहे. आपल्या काही एजन्सी आहेत. त्याच्यामुळे याविषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही.
पण ड्रीमलायनरबाबत जेव्हा करार झाला होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यासंदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानाची क्षमता, इंजिन याविषयी भाजपने शंका घातली होती. UPA च्या काळात या विमानांची खरेदी झाली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता.
बातमी अपडेट होत आहे…