Sanjay Raut: फडणवीस राजकारणातील खलनायक, अनेकांचा छळ केला, आम्हालाही कारवाया करता येतील, राऊतांचा इशारा


Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: फडणवीस हे राजकारणातील खलनायक आहेत. त्यांनी राज्यात सुडाचं राजकारण केलं आणि संधी मिळताच लोकांनी त्यांना दाखवून दिलं की हे महाराष्ट्रात चालणार नाही. राजकारणातील एक पिढी संपवण्याच काम त्यांनी केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर आगपाखड केली.