Railway Stations Names Change: मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांच्या नावात बदल, विधान परिषदेत प्रस्ताव मंजूर; अशी आहेत नवीन नावे, जाणून घ्या एका क्लिकवर…

मुंबई: मुंबई शहरातील सात रेल्वे स्थानकांची नावे बदल्याचा प्रस्ताव आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. यात मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ३ स्थानकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. आता या संदर्भातील प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आलाय.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी मुंबईतील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि उपसभापती नीलम गोऱ्हे तो मंजूर झाल्याचे जाहीर केले. आज मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकाचे नाव लालबाग स्टेशन, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाडे नाव डोंगरी तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्सचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोडचे नाव गिरगाव रेल्वे स्थान असे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Mihir Shah Arrest: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, अपघातानंतर ४८ तासांनी शहापूर येथून केली अटक

हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव आता काळाचौकी असे करण्यात येणार आहे. तर डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे माझगाव रेल्वे स्थानक असे करण्यात येईल. हार्बर मार्गावरील आणखी एक म्हणजे किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Jasprit Bumrah And Smriti Mandhana: टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदानंतर सर्वात मोठी बातमी; भारतीय क्रिकेटसाठी आनंदाचा डबल धमाका, ICCकडून दोघांचा सन्मान

कोणत्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार, अशी आहे संपूर्ण यादी

जुने नाव प्रस्तावित नवे नाव
करी रोड लालबाग (मध्य रेल्वे)
सॅण्डहर्स्ट रोड डोंगरी (मध्य रेल्वे)
मरीन लाईन्स मुंबादेवी (पश्चिम रेल्वे)
चर्नी रोड गिरगाव (पश्चिम रेल्वे)
किंग सर्कल तीर्थंकर पार्श्वनाथ (हार्बर मार्ग)
डॉकयार्ड माझगाव(हार्बर मार्ग)
कॉटन ग्रीन काळाचौकी(हार्बर मार्ग)

विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेला हा प्रस्ताव आता विधान सभेत देखील मंजूर केला जाईल आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्य सरकारकडून नावे बदलण्याचा हा प्रस्ताव झाला असला तरी याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असेल. या प्रस्तावाला केंद्राची मंजूरी दिल्यानंतरच प्रत्यक्षात स्थानकांची नावे बदलली जातील.