Pune Water Crisis : पुणेकरांचा पाणीप्रश्न धंगेकरांनी विधानसभेत धरला लावून, सरकारला विचारला जाब

पुणे : पावसाळा सुरू झाला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये धरणात अपेक्षित असा पाऊस न पडल्याने नागरिकांवर पाण्याचे आणीबाणीचे संकट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आहेत. यातच विद्येचे माहेर म्हणून ओळखले जाणारे पुणे सुद्धा पाण्याविना तहानलेले दिसत आहे. मार्च एप्रिलपासूनच पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात आली होती. २४ बाय ७ ही योजना फक्त कागदीच राहिली आहे प्रत्यक्षात मात्र योजना अद्याप लागू झालेली नाही. पुण्यातील काही भागांमध्ये अस्वच्छ पाणी येत असल्याची सुद्धा तक्रार येत आहे अशातच पावसाळी अधिवेशनात आमदार रविंद्र धंगेकर यांनी पाण्याचा प्रश्न उचलत पुणेकरांच्या वतीने सरकारला जाब विचारला आहे.

रविंद्र धंगेकर काय म्हणाले
पुण्यातील पाणी प्रश्नावर मी सातत्याने सरकारचे लक्ष वेधून घेतोय, मागील पावसाळी अधिवेशनात सुद्धा मी पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला होता.पुण्याचा पाणी प्रश्नाकडे गांभीर्यांने पाहणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहेत, अशुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना होतोय, पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना रोगराईची समस्या भेडसावते. अशात सरकारने लवकर लक्ष देत टँकर माफियावर चाप लावला पाहिजे तसेच पाणी पुरवठ्यासाठी योजना लवकर अंमलात आणल्या पाहिजे अशी मागणी धगेकरांनी केली.
नाशिककरांवरील जलसंकट ‘जैसे थे’! कश्यपीतून तीन दिवसांचेच पाणी, पंधरा दिवसांचा ‘शॉर्टफॉल’ कायम

याआधीच पुण्यासाठी २१ टीएममसी पाण्याचा साठा मंजूर करा अशी मागणी करण्यात आली होती अशी माहिती सभागृहात धंगेकरांनी दिली, पण तत्कालीन राज्यसरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता लोकांना भासू लागली आहे. महापालिकेत नव्याने सामिल झालेल्या ३४ गावांसह पुणेकरांना आता रोज पाण्याचा अडचणीला सामोरे जावे लागते. यासाठी पुन्हा एकदा पुणेकरांसाठी २१ टीएमसी पाणी मंजूर करा अशी मागणी सभागृहात धंगेकरांनी राज्यसरकारकडे केली आहे.


गुरुवारी ४ जुलैला उद्या देखभालीचे काम महापालिकेने हाती घेतल्याने काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यासह मागील एका आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने पुण्यातील खडकवासला धरणार ४.३५ टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे तुर्तास तरी पुणेकरांना पाणीपुरवठा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे, कारण मे च्या अखेरीस धरणाने तळ गाठला होता.