नाशिक-कळवण महामार्गावर कार थेट बंगल्यात घुसली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले आहेत. कोल्हापूर फाट्यावर हा भीषण अपघात घडला. भदाण कुटुंबियांवर काळाने घाला घातला. नाशिकमध्ये एका लग्नसमारंभानंतर हे कुटुंब परत होते. बुधवारी रात्री 10 वाजता हा कार अपघात झाला. या अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढावला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटला
नामपूर येथील भदाण कुटुंबियांच्या नातेवाईकाचे नाशिकमध्ये लग्न होते. त्यासाठी भदाण आणि मेतकर कुटुंबिय नाशिकला आले होते. लग्नानंतर हे सर्व जण कारमधून सटाण्याकडे निघाले होते. नाशिक-कळवण महामार्गावर कोल्हापूर फाटा आला तेव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यात घुसवली. ही कार बंगल्यात जाऊन आदळली. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते.
बातमी अपेडट होत आहे…