Nana Patole Criticizes BJP :  महाराष्ट्र शाहू, फूले, आंबेडकरांच्या विचारावर चालणारं राज्य; इथे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही- नाना पटोले कडाडले

मुंबई : नाशिकच्या काळाराम मंदिरात शुक्रवार (21 जून) रोजी दलित जातीय विरोध पत्रकाचे वाटप करण्यात आल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे. सरकार राज्यात चातुर्वर्ण्य पद्धत आणण्याचा विचार करत आहे. महाराष्ट्र शाहू, फूले, आंबेडकरांच्या विचारावर चालणारे राज्य असून जनता हे खपवून घेणार नाही. असं म्हणत पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात जातीय व्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू

नाना पटोले यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ” राज्यात जातीय व्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. नाशिक मधील प्रकार अतिशय निंदनीय आहे. राज्य सरकारने या अशा घटनांवर लक्ष द्यावं आणि ज्या लोकांनी हे पाप केलं आहे त्या लोकांना कठोर शिक्षा द्यावी.”


Laxman Hake: आंदोलन स्थगित केले, थांबवले नाही; शिष्टमंडळाच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके यांची मोठी घोषणा

आरक्षणासंदर्भात भाजपच्या नेत्यांची वेगळी भूमिका

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय ते म्हणाले की,” भाजपच्या नेत्यांची आरक्षणासंदर्भातील भूमिका वेगवेगळी आहे. तिकडे बावनकुळे म्हणतात 50 टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही तर फडणवीस म्हणतात आम्ही आरक्षण देऊ. यामुळे जनतेच्या मनात आरक्षणाबाबत वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपआपली भूमिका स्पष्ट करावी”

जातनिहाय जनगणना करून 50 टक्क्यांवरील मर्यादा हटवणे हाच पर्याय

50 टक्क्यांवरील आरक्षण कोर्टात टिकणार नाही. पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे स्पष्ट झाले. देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व्हे करून जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे हाच आरक्षणावरचा पर्याय आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असून त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू करावी. जातनिहाय जनगणना करावी अशी आमची पहिल्यापासून मागणी आहेत.राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर जनगणना करण्याचं काम सुरू झालं असतं. असं नाना पटोले यांनी म्हंटलं आहे.