ऑपरेशन सिंदूरसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांकडून मोदी सरकारचं  कौतुक

Maharashtra Times 8 May 2025, 5:51 pm

भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर, यामुळे दहशतवाद मोडून निघेल,असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या स्वागत करत भारतीय सैन्य दलाचे विश्वजीत कदम यांनी अभिनंदन केलं.ऑपरेशन सिंदूर मुळे दहशतवादाचा कणा मोडला आहे, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.ऑपरेशन सिंदूर बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधी पक्ष आणि घटक पक्षांना बोलवण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींनी केलेली ही बाब स्वागतार्ह असल्याचं विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)