MLC Election: तोच पॅटर्न रिटर्न! भाजप बॅक टू बेसिक्स; परिषदेत सुपरहिट फॉर्म्युला रिपीट, विधानसभेला मुसंडी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. राज्यात भाजपला पहिल्यांदा सत्तेत आणणाऱ्या समीकरणांवर भाजपनं काम सुरु केलं आहे. २०१४ पासून नरेंद्र मोदी हाच ब्रँड भाजपनं वापरला. पण लोकसभेत मिळालेलं अपयश पाहता भाजपनं राज्यात जातीय समीकरणांवर विशेष लक्ष दिलं आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून भाजपनं सोशल इंजिनीयरिंग सुरु केलं आहे.

विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांपैकी ९ जागा महायुतीला मिळू शकतात. भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. या ५ जागांसाठी भाजपनं पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखेंना उमेदवारी दिली आहे. भाजपचा पारंपारिक मतदार असलेल्या ओबीसी समाजाला परिषदेच्या निवडणुकीत झुकतं माप देण्यात आलेलं आहे.
MLC Election: भाजपच्या ‘मित्रा’मुळे खासदारकी हुकली; दादा तरुण नेत्याला आमदार करणार? परिषदेसाठी नाव फायनल?
भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी राज्यात पक्ष रुजवताना माधव फॉर्म्युला वापरला. माळी, धनगर आणि वंजारी समाजाला पक्षात प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे ओबीसी मतदार पक्षासोबत जोडले गेले. २०१४ पासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत भाजपनं मोदींचा चेहरा वापरला. पण लोकसभेत झालेला पराभव पाहता भाजपनं पुन्हा एकदा जातीय समीकरणांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
जुन्या पेन्शनसंदर्भात तीन महिन्यांत निर्णय, कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : अजित पवार
राज्यातील ओबीसींमध्ये माळी, धनगर, वंजारी समाजाचं प्राबल्य आहे. विधान परिषदेसाठी भाजपनं उमेदवारी दिलेल्या नेत्यांमध्ये ओबीसींचं प्रमाण अधिक आहे. पंकजा मुंडे वंजारी, योगेश टिळेकर माळी समाजातून येतात. परिणय फुके कुणबी समाजाचे आहेत. तर सदाभाऊ खोत मराठा आहेत. धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांना भाजपनं परभणीतून लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला. त्यांचं पुनर्वसन राज्यसभेच्या माध्यमातून केलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल अशी शक्यता होती. पण भाजप त्यांना राज्यसभेवर राज्यसभेवर पाठवण्याच्या विचारात आहे. विशेष म्हणजे जानकरही त्याचसाठी आग्रही आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसला. मराठवाड्यात भाजपचा चारही जागांवर पराभव झाला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या दिग्गजांना पराभव पाहावा लागला. मराठा मतदार विरोधात गेला. पण ओबीसी मतदारही फारसा सोबत राहिला नाही, अशी भाजपची स्थिती झाली. हीच परिस्थिती विधानसभेला कायम राहिल्यास राज्यात मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव झाल्यानं भाजपनं पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला रिपीट करण्यास सुरुवात केली आहे.