‘या’ठिकाणांना एप्रिलमध्ये करा एक्सप्लोर आणि एका संस्मरणीय अनुभवासाठी व्हा सज्ज

एप्रिल हा महिना थंड हवेच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. कारण या दिवसांमध्ये हिल्स स्टेशनचे हवामान चांगले असते, अशातच तुम्ही एप्रिल महिनाच्या गरमीने हैरान झाले असाल तर कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी भारतातच असे काही थंड हवेचे ठिकाण आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकतात. तसेच या सुंदर निसर्गांच्या सानिध्यात वसलेल्या ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता.

शहराच्या गर्दीपासून दूर, तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. येथे, रोजच्या कामापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवून तुमच्या मनाला आराम द्या.

औली

तुम्हाला जर एप्रिलमध्ये थंड ठिकाणी फिरायला जायचे असेल तर तुम्ही औलीला जाऊ शकता. हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. पर्वतांना वेढलेले ढग, तलाव, धबधबे आणि घनदाट जंगल हे येथील ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. अशातच एप्रिलमध्ये येथील तापमान 10°C ते 20°C च्या आसपास असते. येथे तुम्ही नंदा देवी शिखर, औली तलाव, गुरसो बुग्याल, त्रिशूल शिखर अशी अनेक सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासह किंवा मित्रांसह येथे भेट देण्याची योजना आखू शकता.

माउंट अबू

राजस्थानजवळील माउंट अबू हे भेट देण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे. हे अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह भेट देण्याचा प्लॅन करू शकता. तसेच या ठिकाणाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. ज्यामुळे त्याचे सौंदर्य द्विगुणित होते. येथे तुम्ही दिलवाडा जैन आणि लाल मंदिराला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही गुरु शिखर, नक्की तलाव, अचलगड किल्ला, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, टॉड रॉक, पीस पार्क, चाचा संग्रहालय आणि ट्रेव्हर टँक अशा अनेक ठिकाणी देखील भेट देऊ शकता.

ऊटी

तमिळनाडू राज्यातील नीलगिरी जिल्ह्यात असलेले ऊटी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ एप्रिल महिना आहे. कारण या महिन्यात तेथील नैसर्गिक सौंदर्य सर्वांना मोहित करते. येथे तुम्ही ऊटी तलाव, दोड्डाबेट्टा शिखर, निलगिरी माउंटन रेल्वे आणि बोटॅनिकल गार्डन सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. निलगिरीच्या सर्वात उंच दोड्डाबेट्टा शिखरावरून दिसणारे दृश्य खूपच मनमोहक आहे. भवानी तलाव हे कमी गर्दीचे आणि शांत ठिकाण आहे. वाटेत अ‍ॅव्हलांच लेक, एमराल्ड लेक येतात. यानंतर या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तेथील निसर्ग सौंदर्य खुपच आल्हादायक वाटेल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)