Maharashtra Rain: मुंबईत मुसळधार, राज्यातील अन्य भागांतही अतिवृष्टीचा इशारा, वाचा नेमका कुठे किती पाऊस

मुंबई : नागरिकांनो सतर्क राहा! पुढील २ दिवसांसाठी हवामान विभागाने महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार असल्याचे सूचित केले आहे. शुक्रवारी हवामान विभागाने मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी केला होता, अशीच पुढील दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये स्थिती राहणार आहे. तर राज्यातील अन्य काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरु आहे. पण आता मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यासाठी नागरिकांनो घराबाहेर पडताना सतर्क राहा.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात आणि घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालना, नंदुरूबार या भागांत देखील मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात भीषण जलसंकट! जुलैमध्येही पावसाने दडी मारल्याने जलसाठे तळाला, पेरण्या खोळंबल्या
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सुनील कांबळे म्हणाले, ‘आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आम्ही मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत २-३ दिवस हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
Mumbai Rains: सावधान! पुढील पाच दिवस तुफानी, मुंबईत काही तासात धो-धो बरसणार, पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट
आकडेवारी मांडताना कांबळे पुढे म्हणाले, ‘मुंबईत सुमारे ५५० मिलिमीटर पाऊस पडला आहे, जो नेहमीपेक्षा २०० ते ३०० मिलिमीटरने कमी आहे. जूनमधील पावसाच्या स्थितीनुसार, मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असले तरी ते पोषक आहे आणि अपेक्षेप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रासाठीही पोषक वातावरण आहे.’

जुलैचा अंदाज व्यक्त करताना कुंबळे म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. तरीही घाट भागातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर, आम्ही अतिमुसळधार पावसाबद्दल माहिती देऊच.