Maharashtra Assembly Elections: विधानसभेसाठी महाविकास आघाडीची मोठी घोषणा; लवकरच जागावाटप जाहीर करणार

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी शनिवारी मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत ज्या ताकदीने निवडणुकांना सामोरे गेलो, त्याहून अधिक ताकदीने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभेसाठी लवकरच जागावाटप जाहीर करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेला लोकसभेत जो आशीर्वाद दिला तो विधानसभेतही मिळेल, त्यामुळे महाराष्ट्रात निश्चित सत्ताबद्दल होईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Praniti Shinde: देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम सोलापुरात दंगल घडविणार होते; खासदार प्रणिती शिंदेंनी डागली तोफ

महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन शनिवारी मुंबईत करण्यात आले होते. त्यावेळी वरील घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.
Assembly Elections: मुंबईत एकीचे बळ दाखवल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी; शरद पवार गटाने पुण्यातील ६ मतदारसंघावर केला दावा
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते. येणारी विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून लढणार आहोत, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. तर भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नरेटिव्ह सेट करण्याबाबत टीका करण्यात येत होती. या टीकेलाही उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना मत दिले तर हे तुमची संपत्ती जास्त मुले होणाऱ्यांना वाटतील, मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरं नरेटीव्ह होते का, तुमची म्हैस चोरुन नेतील हे काय खरे नरेटिव्ह होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. नकली सेना, नकली संतान, प्रत्येकाला नोकरी देईन, प्रत्येकाला घरे देईन, उद्योगधंदे येतील, हे खरं नरेटीव्ह होते का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.