हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि कन्या पूजन हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथींना कन्यापूजन केले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार, नवरात्रीतील पूजा कन्या पूजनशिवाय अपूर्ण मानली जाते. मुलींना देवीचे रूप मानून कन्यापूजन केले जाते, परंतु या दरम्यान काही चुका झाल्या तर त्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. म्हणून, कन्यापूजन करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवशी या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी वाढतात.
तुम्ही अनेकवेळा भरपूर मेहनत करता परंतु, मेहनत करून देखील तुम्हाला कामामध्ये प्रगती मिळत नाही. असे तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या दोषामुळे किंवा घरातील वास्तूदोषामुळे होऊ शकतो. तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये व्रत आणि योग्य पद्धतीनं पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात. चैत्र नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्यामुळे तुमच्य महतत्वाच्या कामामधील सर्व समस्या दूर होतील. चला जाणून घेऊया चैत्र नवरात्रीमध्ये कन्या पूजन करण्याची योग्य पद्धत.
कन्यापूजनच्या वेळी ज्या ठिकाणी तुम्हाला कन्यापूजन करायचे आहे ते ठिकाण स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे. घाणेरड्या किंवा अस्वच्छ ठिकाणी मुलीची पूजा केल्याने देवीचे आशीर्वाद मिळत नाहीत. म्हणून, कन्या पूजन करण्यापूर्वी, संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा आणि पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करा. ज्याप्रमाणे कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे कन्या पूजन करण्यापूर्वी स्वच्छतेची काळजी घेतली जाते. कन्या पूजन करण्यापूर्वी, स्वतः स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. यानंतर, घरी परतणाऱ्या मुलींचे हातपाय धुवावेत. असे केल्यामुळे देवी तुमच्यावर खूश होते. धार्मिक श्रद्धेनुसार, कन्या पूजनासाठी 2,5,7 किंवा ९ मुलींना आमंत्रित करणे नेहमीच शुभ मानले जाते. 1,3,6 किंवा 8 मुलींसारख्या विषम संख्यांची पूजा करणे अयोग्य मानले जाते. म्हणून, कन्या पूजेसाठी, नेहमी 2,5,9 किंवा 9 मुलींना आमंत्रित केले पाहिजे. कन्यापूजेच्या वेळी राग, अहंकार किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका.
मुलींना देवीचे रूप मानले जाते, म्हणून त्यांच्याशी अनादराने वागू नका आणि त्यांच्याशी आदराने बोला. पूर्ण भक्ती आणि प्रेमाने मुलींची सेवा आणि पूजा करा. मुलीची पूजा केल्यानंतर, तिला आपल्या क्षमतेनुसार भेटवस्तू, दक्षिणा, फळे किंवा कपडे द्यावेत. कन्यापूजेनंतर, मुलींना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये. असे करणे अशुभ मानले जाते आणि जर तुम्ही असे केले तर देवी दुर्गा दुःखी होऊ शकते. कन्या पूजनासाठी, नेहमी सात्विक अन्न बनवावे ज्यामध्ये कांदा आणि लसूण वापरले जात नाही. आमच्या घरी येणाऱ्या मुलींना फक्त ताजे आणि शुद्ध अन्नच द्यावे. कन्या पूजनाच्या वेळी घाणेरड्या हातांनी स्पर्श केलेले शिळे किंवा अन्न अर्पण करणे अशुभ मानले जाते.