Inside Story : शरद पवारांचं मिशन विधानसभा, दोन शिलेदारांना महाराष्ट्राची जबाबदारी, आठ खासदारांना बळ

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर, शरद पवार आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. निवडून आलेल्या खासदारांसह बड्या नेत्यांकडे मिशन विधानसभा सोपवण्यात आले आहे. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर टोपे-देशमुखांनाही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काल पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Nandurbar ZP : हीना गावितांना पाडलं, आता जिल्हा परिषदेत भाजपची सत्ताही उलथवणार का? आमदार पाडवी हसत म्हणाले…

पुण्यात पाच तास मॅरेथॉन बैठका

निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार गटाचे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते, खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या पवारांचे निवासस्थान मोदी बाग येथे बैठक झाली. तर निसर्ग मंगल कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार निलेश लंके, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.
K P Patil : मविआशी जवळीक वाढली, NCP च्या माजी आमदाराच्या साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड

अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंना राज्यव्यापी जबाबदारी

शिरूर लोकसभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या कडे मोठी जबाबदारी पवारांनी सोपवली आहे. महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ते प्रचार करणार आहेत. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर लाइव्ह शोच्या माध्यमातून हा प्रचार होणार आहे. तर सुप्रिया सुळे यांना महिला आघाडीच्या माध्यमातून राज्यभर महिला मेळावा घेण्याच्या सूचना आहेत. अश्या दोन खासदारांना राज्यव्यापी जबादारी सोपवण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

टोपे-देशमुखांनाही जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाने उतरवलेल्या दहा उमेदवारांपैकी आठ जण शरद पवार गटाचे खासदार म्हणून निवडून आले. या आठ खासदारांना आपापल्या मतदारसंघातील विधानसभांची जबादारी देण्यात आली आहेच. त्यासोबतच राजेश टोपे यांना मराठवाड्याची, तर अनिल देशमुख यांना विदर्भाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे.