इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

आज पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना  घडली आहे. आज रविवार असल्यानं या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अंदाजे 50 च्या आसपास पर्यटक या पूलावर होते. तसेच काही जणांनी या पूलावर आपली बाईक देखील घातली. वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे, याबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी? 

‘ही घटना दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले. तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. काही लोक इथे पर्यटनासाठी आले होते. याचदरम्यान हा पूल कोसळला. पूलावर असलेले पर्यटक नदीत पडले.

आतापर्यंत 38 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे, यातील जे अनेक लोक आहेत त्यांना किरळकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.  जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी आधीच आपण बंदीचे आदेश लागू केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केला होता. पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये असं सांगण्यात आलं होतं. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिला आहे.  तसेच जे लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे.  दरम्यान आज रविवारी असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी झाली, याचवेळी ही घटना घडली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)