शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी अनेक जण नारळाच्या पाण्याचं सेवन करतात. नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे.
मात्र असे देखील काही लोक आहेत, ज्यांना नारळाचं पाणी पिणं माहागात पडू शकतं, आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
नारळाचं पाणी पिणं काही लोकांसाठी अॅलर्जीचं कारण ठरू शकतं, काही लोकांना नारळाच्या पाण्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. ज्यामुळे शरीरावर खाज सुटणे, पुरळ येणे यासारखा त्रास होऊ शकतो.
नारळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमचा साठा असतो, त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, अशा लोकांसाठी नारळाच्या पाण्याचं सेवन त्रासदायक ठरू शकतं. त्यांचा बीपी वाढू शकतो.
नारळ पाणी हे मुळातच थंड असतं त्यामुळे ज्यांना सारखा सर्दीचा त्रास होतो, त्यांनी नारळ पाणी पेऊ नये असा सल्ला दिला जातो.
किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळामध्ये मोठ्याप्रमाणात पोटॅशियम असतं, त्यामुळे त्याला किडनी फिल्टर करू शकत नाही.
ज्यांना साखरेचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील नारळाचं पाणी पेऊ नये, कारण नारळाच्या पाण्यात ग्लाइसेमिक इंडेक्स हा खूप हाय असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांच्या समस्या वाढू शकतात. ( टीप ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्टी करत नाही, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)