Devendra Fadnavis: फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीला उत्तर देण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस यांची कबुली

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीला आपण सोशल मीडियावर उत्तर देण्यात कमी पडलो. पण अशा प्रकारचा अपप्रचार एकदाच चालतो, तो वारंवार कामी येत नाही, त्यामुळे लोकसभेत मागे पडलो असलो तरी बाद झालेलो नाही. भाजप पुन्हा एकदा उसळी मारुन विजयी होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. तर त्याचवेळी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित असून तो आपल्याविरोधातील अपप्रचाराच्या मोहिमेचे बारा वाजविणारा असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. येणारी विधान परिषद निवडणूक मनावर आणि डोक्यावरही घ्यायची असल्याची सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किरण शेलार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळावा मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील विश्वास व्यक्त केला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Raj Thackeray: २० जागा लढणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली; २० जागा का? आपण २०० ते २२५ जागा लढवित आहोत, पण…

यावेळी कार्यकर्त्यांना सूचना करताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकांनी २५ मतदारांपर्यंत पोहचण्याची सूचना केली. या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्याची आवश्यक असून त्यादृष्टीकोनातून काम करण्याची सूचना त्यांनी उपस्थितांना केली. तर भाजपचे कार्यकर्ते ताकदवान आणि क्षमतावान असून असे कार्यकर्ते कोणत्याच पक्षात नाही, त्यामुळे फेक नॅरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील तर आपल्यासाठी मुंबई पदवीधरचा विजय महत्त्चाचा असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. तर भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणू शकतो, हा नॅरेटिव्ह आता आपल्याला सेट करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Rajya Sabha Election: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा NDA विरुद्ध इंडियाची लढाई; राज्यसभेच्या १० जागा रिक्त, पाहा कोणाला मिळणार विजय

तर पराभवातून खचून न जाता, इतिहासातून शिकायचे असते. तेव्हाच नेत्याची खऱ्या अर्थाने पारख होते. त्यामुळे आपल्याला पुढे जायचे असेल तर आपल्याला ही संधी आपल्याकडे आहे. मुंबई पदवीधर हा मतदारसंघ आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. काही कारणामुळे तो मित्रपक्षांना द्यावा लागला. आता आपल्याला ही जागा आपल्याकडे आणण्याची सुवर्णसंधी आलेली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीला तेवढ्याच ताकदीने सोशल मीडियावर उत्तर देऊ शकलो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील १३ आणि देशभरातील ७६ जागा आपण फार कमी मतांनी हारलो. त्यामुळे काही लोकं डमरु वाजवत आहेत. काही लोक छाती बडवित आहेत, पण अपप्रचार एकदाच कामी येतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तर विधानसभेत आपण जास्त जागा जिंकून येऊ त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतही विजय निश्चित असून मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Jagannath Temple: सत्तेत येताच भाजप सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे ३ द्वार केले खुले; इतके वर्ष का बंद होते द्वार? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

जिंकेपर्यंत हार फुले नाही

आपले आमदार दरवेळी हार घेऊन येतात. पण आता जेव्हा जिंकू तेव्हा घार घालू. जोपर्यंत जिंकणार नाही, तोपर्यंत हार नाही फुले नाही, असा निर्धार यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देतानाच मुंबई पदवीधर मतदारसंघात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.