Devendra Fadnavis: एकही शब्द न लिहिता देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; लोकसभेतील पराभवाचा काढला वचपा

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत महायुतीने ९ पैकी ९ उमेदवार निवडून आणले. परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार उभे केल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित होता. अशात महाविकास आघाडीकडून महायुतीला धक्का मिळेल अशी चर्चा होती. त्याला महायुतीने विजयाने उत्तर दिले आणि या विजयाचे हिरो ठरेल ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठा धक्का बसला होता. लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपयशाची जबाबदारी घेत सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी संघटनेचे काम करतो असे त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाला विनंती केली होती. मात्र त्यांची ही विनंती फेटाळून लावण्यात आली.
NCP Won MLC Election : एकच वादा अजितदादा; विधानपरिषदेच्या निकालात १०० टक्के स्ट्राइक रेट, दोन्ही उमेदवार विजयी

विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आणि महायुतीसाठी परिषदेची निवडणूक महत्त्वाची होती. या निकालात भाजपच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली. एकूणच निकाल पाहता महाविकास आघाडीची मते फुटल्याचे दिसत आहे. भाजपच्या विजय उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना २६, योगेश टिळेकर यांना २३, परिणय फुके यांना २६, अमित गोरखे यांना २६ आणि सदाभाऊ खोत यांना २४ मिळाली. महायुतीतील अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांना २३ तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली. शिंदे गटाच्या भावना गवळी यांना २४ तर कृपाल तुमाने यांना २५ मते मिळाली आहेत.
Ajit Pawar: अजितदादांच्या मनात नेमके काय? ९ मंत्र्यांचा लवाजमा घेऊन बारामतीत १४ जुलैला कोणता धमाका करणार? उत्सुकता शिगेला

विधानपरिषद निवडणुकीतील या यशावर भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवर एकही शब्द न लिहिता या विजयावर प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या आणि महायुतीच्या या विजयावर त्यांनी 9/9 थमचा इमोजी शेअर केला आहे. ही पोस्ट करताना त्यांनी निवडणुकीसंदर्भातील हॅशटॅग देखील वापरले आहेत.

फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती, विशेषत: पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विजयामुळे भाजपसह महायुतीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.