संभाजीराजेंनी केली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचे नाव घेण्यात येत आहे. कराडांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण तापले आहे. बीडमध्ये आता मोर्चाला सुरुवात होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी बीडच्या गुन्हेगारी पॅटर्नबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.
19 दिवस उलटले आरोपी मोकाट
‘संतोष देशमुख यांनी क्रूर हत्या झाली, महाराष्ट्र मध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, 19 दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे’, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यांनी आरोपी अटक होत नसल्याने संताप व्यक्त केला.
बातमी अपडेट होत आहे…