Breaking News: वाचा रविवार ३० जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

भारताने विश्व चषक जिंकला आणि अमरावतीत मध्यरात्री मोदी-मोदीच्या घोषणा

वर्ल्ड कप दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने दणदणीत विजय संपादन केला, या विजयानंतर अमरावतीत मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला, दरम्यान मोठ्या प्रमाणात तरुण शहरातील राजकमल चौकात दाखल झाले यावेळी त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, क्रिकेट या खेळात भारताने विजय संपादन केल्यानंतर या उत्साही तरुणांनी मध्यरात्री मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या