Breaking News : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान, दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघ

Raigad : अंत्यविधी सुरू असतानाच मधमाश्याचा हल्ला,१५ ते २० जण जखमी

पोलादपूर तालुक्यातील वडघर येथील अनुबाई कोंडीराम आमले या वयोवृद्ध महिला मयत झाल्याने स्मशानात त्यांचा अंत्यविधी सुरू असतानाच अग्नी दिल्यानंतर स्मशानाशेजारीच असणाऱ्या ऐनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढविला आणि ग्रामस्थांना डंख मारले. यावेळी पिसाळलेल्या मधमाश्यांनी ग्रामस्थांच्या पाठीमागे लागून अनेकांना घरापर्यंत पळविले. मधमाशांचा पिच्छा सोडविताना ग्रामस्थांना कडकडून चावे घेणाऱ्या मधमाशांनी बेजार केले. त्यामुळे ग्रामस्थ वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळत होते या हल्ल्यात सुमारे 15 ते 20 ग्रामस्थांना मधमाशांनी डंख मारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.