आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. मात्र अशा या वातावरणाला गालबोट लावणारी घटना बदलापूरमधून समोर आली आहे. अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी उल्हास नदीत उतरलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धुलिवंदन झाल्यानंतर अंगाला लागलेला रंग काढण्यासाठी ही चारही मुलं उल्हास नदीच्या पाण्यात उतरले होते. मात्र त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं ती पाण्यात बुडाली. आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.
हे चारही मुलं पोद्दार गृह संकुलातील रहिवासी होते. होळीनिमित्त धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी हे चारही मुलं आपल्या इतर मित्रांसोबत उल्हास नदीच्या काठावर आले. ते नदीत उतरले. मात्र त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या मुलांचा शोध घेतला. मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सर्वत्र सणाचा उत्साह असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. अंगाला लागलेला रंग धुण्यासाठी ही मुलं उल्हास नदीवर गेली होती. त्यांच्यासोबत इतरही काही मुलं होती. ही मुलं नदीत उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चारही मुलांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऐन धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.