Bhayandar News: एकमेकांचा हात धरला अन् लोकलसमोर आडवे झाले, भाईंदरमध्ये पिता-पुत्राचा हादरवणारा अंत

ठाणे: मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाने अक्षरश: नागरिकांचा गोंधळ उडाला. लोकलसेवा ठप्प पडली, जनजीवन विस्कळीत झालं. त्यातच सोमवारी भाईंदर परिसरात एक भयानक घटना घडली. येथे भाईंदर रेल्वे स्थानकात पिता-पुत्राने एकत्र आत्महत्या केल्याने खळबळ माजली. या दोघांनी धावत्या ट्रेनसमोर येत आत्महत्या केली. त्यांना ट्रेनसमोर आलेलं पाहून चालकाने ब्रेक लावायचा प्रयत्न केला पण त्यापूर्वीच ते लोकलखाली आले होते.

एकमेकांचा हात हाती घेत बाप-लेकाने आयुष्य संपवलं

या घटनेचं धडकी भरवणारं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. यामध्ये हे दोघे रेल्वे रुळावर लोकलसमोर आडवे होताना दिसून येत आहेत. बाप लेकाने एकमेकांचे हात धरले आणि ते दोघेही लोकलसमोर आडवे झाले. हे दोघेही नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती आहे.
Mumbai Hit And Run: लेकानं दाम्पत्याला उडवलं, मग वडिलांना कॉल; शिंदेसेनेच्या उपनेत्याचा पोराला सल्ला, पोलिसांचा काय दावा?

अचानक लोकलपुढे आले अन्…

सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हे दोघे अचानक रेल्वे रुळावर आले आणि लोकलसमोर आडवे झाले. त्यांना लोकलपुढे येताना पाहून चालकाने लोकलला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, लोकल थांबेल त्यापूर्वीच हे दोघे लोकलखाली आले असून त्यांचा मृत्यू झालेला होता.

फलाटावरुन खाली उतरले विरारच्या दिशेने जाऊ लागले…

हे दोघे एकमेकांशी बोलत बोलत फलाटावरुन जाताना दिसून आले. हे फलाटावरुन विरारच्या दिशेने जात होते. फलाटावरुन उतरुन ते काही अंतर चालत गेले. त्यानंतर हे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या समोर आडवे आणि काहीच क्षणात त्यांचा जीव गेला.

आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव जय मेहता असल्याची माहिती आहे. तो २२ वर्षांचा होता. तो त्याच्या वडिलांसोबत भाईंदर रेल्वे स्थानकातून निघाला आणि मग दोघांनीही लोकलपुढे स्वत:ला झोकून दिलं. लोकल अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाला. त्यांनी असं का केलं यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसेच, पोलिसांना त्यांच्याकडून कुठली सुसाईड नोटही सापडलेली नाही. मात्र, रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीतील वाद आणि सासरच्या लोकांच्या जाचातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.