दिल्लीत आम आदमी पार्टीत महाभूकंप… मतदानाला पाच दिवस असतानाच 8 आमदारांनी पक्ष सोडला

दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस बाकी असतानाच दिल्लीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीत मोठी फूट पडली आहे. आपच्या 8 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या आमदारांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. त्रिलोकपुरीचे आमदार रोहित महरौलिया, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, कस्तूरबा नगरचे मदनलाल, पालमी सीटचे आमदार भावना गौड, बिजवासनचे बीएस जून, आदर्शनगरचे पवन शर्मा, मादीपूरचे गिरीश सोनी आणि महरौलीचे नरेश यादव यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीत या सर्व आमदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. आज त्यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी देऊन केजरीवाल यांना चांगलाच झटका दिला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)