आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा

संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोटImage Credit source: TV9 Marathi

शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ माजली. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पुढचा बळी कोणाचा, तो मंत्री कोण असे अनेक तर्क व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर आणखी मोठा दावा केला आहे. 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं, त्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपाचेच काही जण मदत करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार राव यांच्यावरही टीका करत अनेक आरोप केले.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये अशी अनेक पात्रं आहेत, ज्यांचे अनेक चेहरे आता समोर यायला लागले आहेत. मुंडे यांचा बळी गेला, अजून काही अशा प्रकारचे लोकांचाही बळी जाईल. जयकुमार रावल यांनी जी रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत, जनतेचा पैसा त्यांनी लाटला आहे. हे प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठवणार आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का ? असा सवाल
मला त्यांना विचारायचा आहे, असे राऊत म्हणाले. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन राव यांनी लाटली, राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली. हायकोर्टाने त्या लूटमारीवर ताशेरेही ओढल्याचे राऊत म्हणाले. असे मंत्री सरकारमध्ये आहेत, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं, बिघडवलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच. आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोकं हत्यारं पुरवत आहेत , असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)