Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनयातून पाच वर्ष ब्रेक, शिरूरच्या मतदानाआधी मोठा निर्णय

शिरूर : शिरूर लोकसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात अनेक कामे केली आहेत, अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत. माझ्या मतदार संघात कामे सुरू असलेले आणि कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यासाठी पुढील पाच वर्ष मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केला आहे.शिरूर लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षात आपण मार्गी लावले आहेत. पुणे – नाशिक हायवे, तळेगाव – चाकण – शिक्रापूर हायवे, पुणे – नगर हायवे यासाठी आपण तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आला, याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे, त्यामुळे अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Sushma Andhare: ‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांना रेणुका शहाणेंनी सुनावले, सुषमा अंधारेंकडून तोंडभरून कौतुक, ‘दिल की बात’ लिहिली!
पुणे – सोलापूर रोडवर वाहतूक कोंडी होते ती सोडविण्यासाठी रवी दर्शन चौकापासून यवत पर्यंतच्या एलिव्हेटड कॉरिडॉरचा DPR नॅशनल हायवेला सादर केला असून त्याच्या मंजुरीची आपण वाट पाहत असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. त्याशिवाय इंद्रायणी मेडीसिटी सारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प आपण शिरूर लोकसभा मतदार संघात आणत आहोत. आदिवासी भागातल्या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीने राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्राच्या प्रकल्पाचा DPR तयार करून आयुष मंत्रालयाला सादर करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Bhendwal Ghat Mandani : तीनशे वर्षांच्या भेंडवळ घट मांडणी परंपरेला आचारसंहितेमुळे ब्रेक, निवडणुकांबाबत या दिवशी करणार भाकित
पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आहे. राजकीय स्थित्यंतरे झाल्याने स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही इतर आठ लोकसभा मतदार संघात प्रचारात जातानाही आपण मला पाहिलेत. पंधरा वर्षात एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर त्या १५ वर्षात मतदार संघात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता, मात्र माझ्या अवघ्या पाच वर्षात हे सर्व प्रोजेक्ट आले आहेत, ते प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत.

या सर्व बाबी प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देता येणं शक्य नाही. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्षांसाठी ब्रेक द्यावा लागणार आहे. मला माहिती आहे अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते, परंतु ज्या शिरूर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकण्याचे ठरविले आहे, त्यांच्यासाठी मला मालिका विश्वातील अभिनयातून पाच वर्ष ब्रेक घ्यावा लागेल, असं सांगत त्यांनी आपला निर्णय चाहत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.