तिसऱ्या टप्प्यात बंपर मतदान; राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? सर्व आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी
रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद – ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१ टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा – ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के
कोल्हापूर – ७०.३५ टक्के

बारामती
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान ५४.५८ टक्के झाले आहे. सर्वाधिक मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात ६४ टक्के झाले असून सर्वांत कमी मतदान अपेक्षेनुसार शहरी भागातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४३ टक्केच झाले आहे. तर इंदापूरमध्ये ६०, दौंडमध्ये ५३, भोरमध्ये ५९, पुरंदरमध्ये ४८ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचा प्रचाराचा भर खडकवासला मतदारसंघात दिसून आला होता. त्यामुळे या मतदारसंघात नेमके किती मतदान होते, याचा थेट परिणाम निकालावर दिसून येणार आहे. आता खडकवासला मतदारसंघात केवळ ४३ टक्के मतदान झाल्याने हे मतदान नेमके कोणाच्या पारड्यात पडले आहे, त्याचा फैसला येत्या ४ जून रोजी होणार आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची टक्केवारी
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ- ६०.०२%
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ- ५९.७३ %
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – ६१.८९%
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ – ५७.३०%
निलंगा विधानसभा मतदारसंघ – ६०.५०%
उदगीर विधानसभा मतदारसंघ – ६१.५०%

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय झालेली मतदानाची टक्केवारी
औसा – 61.65 टक्के
बार्शी – 64.95 टक्के
उमरगा -64.76 टक्के
उस्मानाबाद – 60.21 टक्के
परंडा – 59.35 टक्के
तुळजापूर -61.32 टक्के