विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, २ जागांवर महायुतीला धक्का, १ जागेवर भाजपची बाजी

मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत राज्यात जास्त जागा मिळवल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हाच आत्मविश्वास आता मुंबई पदवीधर निवडणुकीत पहायला मिळाला. मुंबई पदवीधर निवडणुकीचा आज निकाल लागला. विधान परिषद निवडणुकीत राज्यातील ४ जागांवर मतदान झाले. यात १ जागा महायुतीला तर २ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. तर एका जागेचा निकाल अद्याप लागला नाही. मुंबईत दोन, नाशिकमध्ये १ आणि कोकणात १ जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. याचा आज सकाळपासून मतमोजणी सुरू होती. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले आहे.
“कोणाचे पाय चाटून राजकरण करायचे नाही, स्वबळावर लढू” खोतांना टोला तर ‘युती’ आणि ‘मविआ’ला शेट्टींचा इशारा

मुंबई शिक्षक मतदारसंघात जग्गनाथ अभ्यंकरांची बाजी

मुंबई पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकला आहे. मुंबई शिक्षक मतदार संघात अभ्यंकर यांनी बाजी मारली आहे. मुंबई शिक्षक निवडणुकीत अजित पवार गट आणि शिंदे गट यांनी परस्पर उमेदवार उभे केल्याने त्याचा फटका महायुतीला बसला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांच्या विजयाने पदवीधर मतदारसंघ ठाकरे गटाने हाती राखला आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे जग्गनाथ अभ्यंकर यांनी ४ हजार ८३ मते मिळवून भाजपला पराभूत केले आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात होते. तर शिवसेना ठाकरे गटाचे जग्गनाथ अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात होते.

भाजपने कोकणची जागा राखली

कोकण पदवीधरमध्ये भारतीय जनता पार्टीचेचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत यंदा तिसर्‍यांदा मोहर उमटवली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने मारली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे यांच्या रुपाने कोकण पदवीधर मतदारसंघ आपल्या हाती राखण्यात यश मिळविले आहे. डावखरे यांना १ लाख ७१९ मते तर काँग्रेसचे किर यांना २८ हजार ६०५ मते पडली. भाजपचे डावखरे ७२ हजार ११४ मतांनी विजयी झाले.

गोंधळामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निकालाला उशीर

नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झाली असून सकाळी एका मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळून आल्याने मतमोजणी केंद्रात गोंधळ उडाला. यामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली होती. त्यामुळे बराच वेळ वाया गेला. ६४ हजार ८४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यामुळे तीन टप्प्यात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यात प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी झाली असून कोणत्याही उमेदवारीने ३१५७६ मतांचा कोटा कोटा पूर्ण केलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. एकूण १७०२ मतं बाद झाली आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला अजूनही तीन ते चार तास लागण्याची शक्यता असून रात्री उशिरा निकाल जाहीर होणार आहे. अटीतटीच्या या लढतीत बाजी कोण मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.