आणीबाणी मुद्द्यावरुन पीएम मोदींचा एक तीर दोन निशाणे,’संविधाना’च्या मुद्द्यावर दिले प्रत्युत्तर

PM Modi On Congress : राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती. भारतातील स्वातंत्र्य नंतरच्या काळातील वाईट काळ म्हणून आणीबाणीकडे भारतीयांच्या नजरेतून पाहिले जाते. आणीबाणीच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. हीच बाब भाजपाने हेरुन काँग्रेस विरोधात टीकेची झोड उठवली आहे. कालपासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधकांनी संविधानाची प्रत हातात घेत संसद परिसरात एनडीए विरोधात निदर्शन केली. काल लोकसभा अधिवेशन सुरु होण्याआधीच मोदींनी देशाला संबोधित करताना आणीबाणीच्या काळाची आठवण करुन देत काँग्रेसवर टीका केली होती. आज मोदींनी संविधानांच्या मुद्द्यावर काँग्रेसवर पलटवार केला आहे.

मोदी ट्वीट करुन काय म्हणाले?

“आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या सर्व पुरुष आणि स्त्रियांना आदरांजली वाहण्याचा आज दिवस आहे. आणीबाणीचा काळ आपल्याला आठवण करुन देतो की देशातील नागरिक ज्या संविधानाला सर्वोच्च मानतो त्याच संविधानाची मूल्य काँग्रेसने पायदळी तुडवले. सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसने देशातील नागरिकांचा लोकशाहीचा अधिकार हिसकावून घेतला त्यांना तुरुंगात टाकले. पुढे मोदींनी ट्वीट केले याच लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला, निर्भीड पत्रकारितेची मूल्य चिरडली, नागरिकांच्या प्रत्येक मूलभुत अधिकारांवर गदा आणली. आणीबाणी लादणारा पक्ष त्याच विचारधारेने अजूनही जिवंत आहे, देशातील नागरिकांनी म्हणून त्यांना सत्तेबाहेर ठेवले आहे” असे मोदींनी ट्वीट करुन काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
PM Modi, Rahul Gandhi: मोदी शपथ घ्यायला गेले, सर्वांना अभिवादन; राहुलही दिसले, मोदींनी हात जोडले अन् मग…

काल सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदींनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर आले होते यावेळी मोदींना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली होती. विरोधकांनी लोकसभेच्या निवडणुकीत मोदी चारशे पार झाल्यावर संविधान बदलतील असा आरोप केला होता. विरोधकांचा संविधान बदलण्याच्या आरोपामुळे लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला.

यानंतरही काल संसदेत संविधानाची प्रत हातात घेत विरोधकांनी संसदभवनात प्रवेश केला. याच गोष्टीवरुन मोदींनी आज संविधानाचा मुद्द्यावर काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटमध्ये मोदी म्हणालेत ज्यांनी आणीबाणीचा विरोध केला त्यांना त्रास दिला. ज्या पक्षाने देशात आणीबाणी लागू केली त्या पक्षाला संविधानाबद्दल बेगडी प्रेम दाखवण्याचा अधिकार नाही.