Today Top 10 Headlines in Marathi: शिंदेंसमोरच गणेश नाईकांचं फडणवीसांवर स्तुतिसुमन, वर्ल्डकपमधून पाकिस्तानचं निर्गमन, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. कोकण, मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच दमदार हजेरी लावली. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मुंबईसह अनेक भागातून पाऊस गायब झाल्याचं चित्र आहे. रविवारी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, रविवारीही मान्सूनच्या वाटचालीत कुठलीच प्रगती दिसून आली नाही. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच भागात अद्याप मान्सून पोहोचलेला नाही.

२.शिंदेंसमोरच गणेश नाईकांची मन की बात

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, पण आमच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस हेच नेते आहे, असं भाजप आमदार गणेश नाईक म्हणाले. विशेष म्हणजे शिंदेच्या समोरच त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे नाईकांच्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेत काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहणं रंजक ठरणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात नाईक बोलत होते. अधिक बातमी सविस्तर वाचा

३. मविआचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणाला किती जागा?

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूकही सोबत लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं जागावाटपाची चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला ४ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याआधी तयारीला वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर उरकण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. मविआचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.

४. EVM अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर खरंच OTP येतो?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) अनलॉक करण्यासाठी मोबाईल फोनवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येत नाही. कारण या यंत्रात वायरलेस संदेशवहनाची क्षमता नाही. इव्हीएमचे कुठल्याही प्रकारे हॅकिंग शक्य नसून त्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही, असे स्पष्टीकरण मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यंवशी यांनी दिले आहे. अधिक बातमी सविस्तर वाचा

५. AI द्वारे EVM हॅकिंगचा धोका, मस्कचा दावा, भाजप नेता म्हणतो

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत असताना मतदानयंत्रावरून (ईव्हीएम) पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेवर ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाबाबतच्या वृत्ताआधारे पुन्हा ‘ईव्हीएम’विरोधी सूर लावला.

६. ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

राज्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये ‘पीसीबी’ गटातील १७ विद्यार्थ्यांचा, तर ‘पीसीएम’ गटातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आदित्य करपे (पीसीबी), सोहम लगड (पीसीबी) आणि अमलेश घाटे (पीसीएम) अशा तिघांना १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहे.

७. MSEBच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधलं

चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्याला तब्बल दोन तास विद्युत खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. खांबाला बांधून ठेवल्यावर मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी गर्दी केली होती. महावितरणाचे सहायक अभियंता नयन भटारकर यांनी कर्मचाऱ्याला सोडवून आणले.

८. Drishyam च्या मराठमोळ्या दिग्दर्शकाची कहाणी

दृष्यम आणि मदारी यांसारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणारे दिवंगत चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांचा आज जन्म दिवस. १७ जून १९७० रोजी मुंबईतल्या दादर येथे त्यांचा जन्म झाला. निशिकांत यांचे १७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते.

९. पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर पण बाबर आझमने…

टी-२० वर्ल्डकप मधून आता पाकिस्तानला माघारी परतावे लागले आहे. या वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानने चार सामने खेळले असून केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. पाकिस्तानविरुद्ध आयर्लंड सामन्यात पाकिस्तानने रडत रडत सामना जिंकला. सेंट्रल ब्रॉव्हर्ड रिजिनल पार्क येथे रंगलेल्या पाकिस्तानविरुद्ध आयर्लंड सामन्यात पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयसोबतच कर्णधार बाबर आझमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अधिक बातमी सविस्तर वाचा

१०. कापला गेलेला इन्कम टॅक्स परत कसा मिळवायचा?

व्यावसायिक करदात्याला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रकमेवर मुळातून करकपात (TDS) होते. तसेच बँकेच्या किंवा कंपन्याच्या ठेवींवरील व्याज, लाभांश, दुकान किंवा घराचे मिळणारे भाडे आदी रकमांवर कर कापला जातो. हा कापलेला कर म्हणजे आपल्या वतीने रक्कम देणाऱ्याने सरकारमध्ये भरलेला प्राप्तिकर असतो. तसे प्रमाणपत्र कर कापणारा आपल्याला देत असतो.