Water crisis in Maharashtra: महाराष्ट्रात पाणीबाणी; राज्यातील धरणांमध्ये फक्त इतके टक्के पाणीसाठा शिल्लक

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील पाणीसाठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. जलसंपदा विभागातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये २०.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक कमी पाणीसाठा छत्रपती संभाजी नगर येथील धरणांमध्ये असून संभाजी नगरमध्ये केवळ ८.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे धरणांमधील पाणीसाठा कमी होत असतानाच टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढले असून गुरुवारी राज्यभरात ३ हजार ९६६ टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा जलसंपदा विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील एकूण २ हजार ९९७ धरणांमध्ये गुरुवारपर्यंत १४,६९८.८५ द.ल.क्ष.मी इतका पाणीसाठा आहे, त्यापैकी केवळ ८,३५८.८५ द.ल.क्ष.मी इतका पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती यावेळी या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार गेल्यावर्षी याच दिवशी २९.२२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदाच्यावर्षी पाणीसाठ्याचे प्रमाण जवळपास ९ टक्क्यांनी कमी नोंदविले आहे.
Breaking News: निकालानंतर खदखद बाहेर निघण्यास सुरूवात; पारनेरमध्ये खासदार लंके-विखे समर्थकांचा राडा, लंके समर्थक झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला

जलसंपदा विभागातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सर्वात कमी पाणीसाठा छत्रपती संभाजी नगर येथील ९२० धरणांमध्ये आढळून आला आहे. संभाजी नगर येथील या धरणांमध्ये केवळ ८.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आला आहे. संभाजी नगर पाठोपाठ पुण्यातील धरणांमध्ये केवळ १३.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
Nitish Kumar in NDA govt: नितीश कुमारांची शांतता वादळापूर्वीची तर नाही? मोदींकडून काय काय मागायचे याची यादी तयार, फक्त…
तर सर्वात जास्त पाणीसाठा हा अमरावती विभागातील एकूण २६४ धरणांमध्ये आढळून आला असून अमरावतीत गुरुवारी ३७.६१ टक्के इतका पाणीसाठा नमूद करण्यात आला आहे. अमरावती पाठोपाठा नागपूर येथे ३७.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक येथे २३.२८ टक्के इतका तर कोकणात ३१.३९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

राज्यात ३ हजार ९६६ टँकर

राज्यात एकूण २५ जिल्ह्यातील ३ हजार २७८ गावे आणि ८२८७ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यात एकूण ९९ शासकीय आणि ३ हजार ८८६८ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यात छत्रपती संभाजी नगर येथे सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरु असून १ हजार ९७७ ने टँकरने सुरु असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.