अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यावरून भाजपचे राजकारण, विशाल पाटलांचा आरोप

10 Feb 2025, 12:48 pm

अलमट्टी धरणाच्या उंचीवरून भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलाय. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णयाला कृष्णा पाणी लवादाने मंजुरी देखील दिलीये. या निर्णयानंतर महाराष्ट्रसह कोणत्याही राज्याने उंची वाढण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी केला. पाच मीटरने उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येणार असल्याचा दावा जलतज्ञांनी केलाय.खरंतर महाराष्ट्राकडून उंची वाढवण्यास विरोध व्हायला अपेक्षित होता परंतु तो झाला नसल्याचं दिसतंय.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)