पंचाला मिळालेली शिक्षा कमीच, चंद्रहार पाटलांकडून संताप व्यक्त करत शिवराज राक्षेची पाठराखण

3 Feb 2025, 2:11 pm

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचा प्रकार घडला.पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा शिवराज राक्षे यानं केला आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ही शिवराज राक्षेची पाठराखण केली आहे.पंचांचा निर्णय वादग्रस्त होता, त्यांना मिळालेली शिक्षा कमीच आहे असं चंद्रहार पाटील म्हणाले.मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना अशा वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय असं चंद्रहार पाटील म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)