काँग्रेसनं उमेदवार देताच भाजपचंही ठरलं; उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात? कुठून लढणार?

मुंबई: उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महायुतीदेखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण उत्तर मध्य मुंबईत भाजपनं अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही. २०१४ पासून पूनम महाजन इथल्या खासदार आहेत. पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुंबईत तीन जागा जिंकल्या. यातील दोन जागांवर भाजपनं उमेदवार दिले आहेत. विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत. त्यानंतर आता पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप इथून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची घोषणा आजच केली जाऊ शकते.
‘ती’ भेट वनवे नव्हती; स्क्रीप्ट ठरलेली, साहेब पाठिंबा देणार होते; तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेता सचिन खेडेकर यांची नावं चर्चेत होती. भाजपनं ८ ते १० दिवसांपूर्वी निकम यांच्याशी संपर्क साधला होता. उत्तर मध्यसाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतं. निकम यांचा चेहरा सुपरिचित आहे. ते ज्येष्ठ विधीज्ञ आहेत. त्यामुळे भाजपनं निकम यांना लोकसभेसाठी विचारणा केली होती.
पुतण्यासोबत पॅचअप होणार? काकांनी एका वाक्यात विषय संपवला; भाजपला ‘कल्याण’ पाहण्याचा सल्ला
उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे आहेत. पण त्यांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत वा २६/११ चा दहशतवादी हल्ला, निकम यांनी महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ते सुपरिचित चेहरा आहेत. निकम यांच्या नावाची घोषणा आज महाराष्ट्र भाजपचे निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा करू शकतात.

भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं, गुजरातमध्ये पहिला खासदार बिनविरोध विजयी

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं कालच वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. उत्तर मध्य मुंबईत महायुतीची चांगली ताकद आहे. या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. इथे शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी २ आमदार आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.