Sangli Khanapur Fomrer Deputy Sarpanch Murder: चव्हाण यांच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.
हायलाइट्स:
माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या
दिवसाढवळ्या घडली घटना
सांगतीलील घक्कादायक घटना
Lipi खानापूर घानवड माजी उपसरपंच हत्यास्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील घानवड ता. खानापूर. येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गार्डी नेवरी रस्त्यावर दिवसाढवळ्या हा थरारक प्रसंग घडल्याने सर्वत्र खळखळ उडाली आहे. चव्हाण यांचा खून करून हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध विटा पोलीस करीत आहेत. चव्हाण हे पोल्ट्री तर विटा येथे सराफ व्यवसाय करत होते. काल दुपारी ते घानवड येथून गार्डी नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून निघाले होते. ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अनोळखी व्यक्तीने खून केला. चव्हाण यांच्या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून करून पसार झालेल्या हल्लेखोरांचा विटा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. बापूराव चव्हाण यांच्या खुनामुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे. Today Top 10 Headlines in Marathi: शपथ घेताना आपल्या नावाआधी आईचं नाव, कारण काय? सांगलीत माजी उपसरपंचाची गळा चिरुन हत्या; सकाळच्या दहा हेडलाईन्स
गोदावरी नदीत कार कोसळली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात एक भीषण अपघात झाला होता. सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीनजण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले असल्याची हृदयद्रावक घटना घडली. जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश होता.
मध्यरात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात झाला. लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट कृष्णा नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत. कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंब सांगलीकडे येत होते. त्यांची गाडी जयसिंगपूरहुन सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नदी पात्रात कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)