श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात टक्केवारी घटली, दक्षिण मुंबईकर उशिरा जागे, कुठे किती मतदान?

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे. कल्याणमध्ये सर्वात कमी (११.४६ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर पालघरमध्ये सर्वाधिक (१८.६० टक्के) मतदान झाले आहे. मुंबईचा विचार करता, मुंबई दक्षिण भागात सर्वात कमी (१२.७५ टक्के), तर मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सर्वाधिक- १७.५३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे.

पाचव्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के
Sharad Pawar : मोदींनी PM पदाची प्रतिष्ठा घालवली; कोणे काळी आरोप करणारे हजारे-खैरनार आता कुठेत? पवारांचा सवाल

मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

१७२-अणुशक्ती नगर – १५.०५ टक्के
१७३-चेंबूर – १६.६१ टक्के
१७८-धारावी – १३.८५ टक्के
१८१-माहीम – २०. ९२ टक्के
१७९-शीव कोळीवाडा – १७.५० टक्के
१८०- वडाळा – १६.७१ टक्के
मतदान न केल्यास तीन दिवसाचा पगार कट; यादीत नाव नसलेल्या तरुणीचा संताप, कल्याणमध्ये गोंधळ

मुंबई दक्षिण विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

१८४-भायखळा – ०९.०० टक्के
१८७-कुलाबा -१०.१० टक्के
१८५-मलबार हिल – १९.३९ टक्के
१८६-मुंबादेवी – १४.१६ टक्के
१८३- शिवडी – १५.०५ टक्के
१८२-वरळी – ०८.८० टक्के
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

ठाणे विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

140 अंबरनाथ – 11.24 टक्के
141 उल्हासनगर – 11.09 टक्के
142 कल्याण पूर्व – 15.11 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 10.60 टक्के
149 मुंब्रा कळवा – 13.03 टक्के