मनसे प्रमुखांसोबत ‘असा’ योग पहिल्यांदाच; पार्कात आज मोदींचा जलवा, राज ठाकरेंचा नंबर कितवा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं आहे. त्या निमित्तानं आज मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा होत आहेत. महायुतीची प्रचारसभा शिवाजी पार्कात होईल, तर महाविकास आघाडीची प्रचारसभा बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होत आहे. गेल्या निवडणुकीत या ६ जागा भाजप, शिवसेनेनं जिंकल्या होत्या. पण गेल्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता यंदा काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंची शिवसेना दादरमधील शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यास उत्सुक होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आधीच अर्ज केल्यानं त्यांना मैदान मिळालं. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात आज राज यांची तोफ महायुतीसाठी धडाडेल. राज्यात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर असतील. त्यामुळे महायुतीची सभा लक्षवेधी आणि ऐतिहासिक असेल.
Devendra Fadnavis: पुढचा CM कोणाचा? फडणवीसांकडून शिंदे अन् आकड्यांचा दाखला, सुत्राचा विषय विस्कटून सांगितला
महायुतीच्या सभेत मोदींचा ‘जलवा’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना २००६ मध्ये झाली. तेव्हापासून शिवाजी पार्कमधील सभेत राज यांचं भाषण शेवटचं असतं. प्रमुख वक्ते, पक्षाचे अध्यक्ष असल्यानं राज यांचं भाषण अखेरचं असतं. पण आज शिवाजी पार्कात वेगळं चित्र दिसेल. आज शिवाजी पार्कात होणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचं भाषण करतील. त्यांच्या आधी राज यांचं भाषण होईल. शिवाजी पार्कात सभा आणि राज यांचं अखेरचं भाषण नाही, असं कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच घडेल. आजच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील.
Sharad Pawar: मोदींना एकदा इस्रायलला जायचं होतं, त्यावेळी..; जुना किस्सा सांगत शरद पवारांचा मोदींवर निशाणा
महाविकास आघाडीत ‘शो स्टॉपर’ कोण?
महाविकास आघाडीच्या सभेत शेवटचं भाषण कोणाचं होणार याबद्दलची उत्कंठा कायम असेल. वांद्रे कुर्ला संकुलात होणाऱ्या इंडिया आघाडीच्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. या सभेत अखेरचं भाषण कोणाचं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीतील जागावाटप पाहिल्यास ठाकरेसेना सर्वाधिक २१ जागा लढत आहे. तर काँग्रेस १७ जागांवर लढत आहे. त्यामुळे शेवटचं भाषण उद्धव ठाकरे करणार की मल्लिकार्जुन खर्गे हा प्रश्न आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही सभेला हजेरी असेल. ते मुख्यमंत्रिपदावर असल्यानं त्यांना शेवटचं भाषण करण्याची संधी दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.