Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग आता कोणीही थांबवू शकत नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुरबाड : देशात मोदी सरकारच्या स्थापनेनंतरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद केली असून, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग आता कोणीही थांबवू शकत नाही. पुढील टप्प्यात नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.