सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, मात्र अजित पवार हे…

मुंबई : ‘सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले, त्यात चुकीचं काही नव्हतं. या प्रकरणात मी जे प्रश्न उपस्थित केले, त्यानुसार कारवाई करण्यात आली’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी २०१४ मध्ये अजित पवार, तर गँगस्टर इक्बाल मिर्चीशी असलेल्या कथित संबंधांबद्दल प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप करणे ही चूक होती का? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी एका मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पहिल्यांदाच एकत्रित सामोरे जात आहेत. गेली काही वर्ष विरोधात असताना, भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्यावरुन फडणवीसांना सवाल विचारले जात आहेत. यावरुन फडणवीसांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मी लावलेले सर्व आरोप खरे ठरले. मी उपस्थित केलेल्या सर्व बाबींवर कारवाई करण्यात आली. त्या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले, आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि काही जणांना दोषीही ठरवण्यात आले. यामुळे सर्व निकष दुरुस्त करण्यात आल्याचे मला समाधान आहे. भ्रष्ट कारभाराला आळा बसला आणि निविदा प्रक्रियेत सर्व नवीन नियम व अटी लागू करण्यात आल्या, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Narendra Modi : एकनाथ शिंदे कल्याणहून रवाना, नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही निघा, मी इथे सांभाळतो…
दुसरा मुद्दा, म्हणजे अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. या १३-१४ वर्षांत तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी त्यांच्यावर (अजित) थेट भूमिका असल्याचं म्हटलं नाही. शेवटी, आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागतेच, असं फडणवीस पुढे म्हणाले.
Prithviraj Chavan : सहा राज्यात भाजपच्या जागा घटणार, एकूण जागा फारतर २५०, पृथ्वीराज चव्हाणांचं लॉजिकल विश्लेषणRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

कोकण विभागातील प्रकरणांमध्ये, एका यंत्रणेने एका आरोपपत्रात असेही म्हटले होते की, “आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भूमिकेचे तपासत आहोत.” शेवटी त्यांना काही सापडले नाही. म्हणजे एकाही आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.