सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका, एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

मुंबई : अॅड गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांना सहकार खात्याने दणका दिला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील सदावर्ते दाम्पत्याचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे.

सदावर्ते दाम्पत्य यापुढे एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाज करु शकणार नाही, असा निर्णय सहकार विभागाने दिला आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये सहकार आयुक्तांकडे दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सदावर्ते दाम्पत्याच्या हातात एसटी बँकेचा कारभार गेल्यापासूनच नाराजी व्यक्त केली जात होती. सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्तेंनी नियम मोडल्याचं निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.
शपथविधीत वळसेंचं नाव आलं अन् गडी बिथरला; हा काय एवढा मोठा नेता आहे? अजितदादांच्या अशोक पवारांना कानपिचक्या
‘तब्बल चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेतून ४७९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या आहेत. कर्ज आणि ठेवी यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जवाटपावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे खाते असलेली बँक वाचवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी’, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली होती.
गोडसेंचा अर्ज, ईव्हीएमवरुन ठाकरेंच्या उमेदवाराचं नाव दुसऱ्यावरुन तिसऱ्या नंबरवर, सगळे गोंधळात
राज्यातील ५० हून अधिक शाखांमध्ये ६२ हजार एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत. बँकेत नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर व्यवस्थापनात हुकूमशाही सुरू आहे. नियम डावलून बँकेत ३७ जणांची भर्ती करण्यात आली. ठेवी काढल्याने सीडी रेशो ९५.३५ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारच्या सहकार खात्याचे बँकेकडील दुर्लक्ष याला जबाबदार आहे. सभासदांनी मागणी केल्यानंतर बैठक ही लावण्यात येत नाही. संचालकांच्या मताशिवाय कर्जवाटप होत असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप बरगे यांनी केले होते.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News

गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे सदावर्ते व त्यांच्या पत्नीला बँकेच्या तांत्रिक मंडळावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी केली होती.